जालना

रियाधमध्ये अडकलेल्या भोकरदनच्या ४१ प्रवाशांचा परतीचा मार्ग सुकर

सौदी अरेबियातील रियाध येथे अडकलेल्या भोकरदन तालुक्यातील ४१ प्रवाशांचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून, खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्तक्षेपामुळे एअरलाइनला माघार घ्यावी लागली आहे. ‘अकासा एअर’ने उड्डाण अचानक रद्द करून प्रवाशांना अडचणीत टाकले होते. मात्र सुळे यांच्या ट्विटनंतर परिस्थिती पालटली. रियाधहून मुंबईकडे सोमवारी (ता. ६) येणारे उड्डाण रद्द झाल्यामुळे भोकरदन (जि. जालना) तालुक्यातील सर्व प्रवासी […]

छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)

भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण हाताबाहेर

राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातचे प्रकरण अत्यंत मोठे आहे. हे प्रकरण अगदी हाताच्या बाहेर असल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांसह सर्व यंत्रणा याची सखोल चौकशी करीत आहेत. चौकशीत जे काही निष्पन्न होईल, त्याला खरातबाबाला सामोरे जावे लागेल, असे मत रोहयो मंत्री भरत गोगावले यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केले. जिल्हाधिकारी कार्यालयात रोजगार हमी योजना व भूसंपादन […]

नांदेड

निर्यातीअभावी भाव पडले, लाखो रुपयांचा खर्च मातीत

अर्धापूर तालुका हा केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, ७० ते ८० टक्के क्षेत्रावर केळीची लागवड झाली आहे. सध्या पाच ते दहा टक्के शेतकऱ्यांची केळी काढणीस आली आहे. मात्र, बाजारपेठेत केळीला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता केळीच्या दरातील मोठी घसरण आणखी गंभीर समस्या ठरत आहे. गतवर्षी […]

धाराशिव

अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही

“अजितदादांच्या विमान अपघाताबाबतचा जो प्राथमिक अहवाल समोर आला आहे, त्यावर आम्ही अजिबात समाधानी नाहीत. या प्रकरणाचा सखोल तपास होऊन सत्य जनतेसमोर आलेच पाहिजे,” अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अ.प.) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मांडली. सुनील तटकरे यांनी रविवारी श्री क्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी विविध राजकीय आणि सामाजिक विषयांवर […]

सोलापूर

हातात संविधान घेऊन ज्योती वाघमारे यांनी घेतली खासदारकीची शपथ

कपाळावर आडवा गंध, खाली चंद्रकोर.. निळी रंगाची नऊवारी साडी अशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा, आता देशाच्या संविधानाची प्रत घेऊन शिंदेसेनेच्या प्रदेश प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे यांनी सोमवारी संसदेत राज्यसभेच्या सदसत्वाची शपथ घेतली. शपथ समारंभा नंतर संसदेच्या पायऱ्यांवर माथा टेकला. राज्यसभेच्या नव्या सदस्यांचा शपथविधी समारंभ राज्यसभेच्या सभागृहात सोमवारी उपराष्ट्रपती सी.पी. राधाकृष्णन यांच्या उपस्थितीत झाला. यात […]

सातारा

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवर प्रश्नचिन्ह

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्षपद निवड प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी चुकीच्या पध्दतीने राबविली आहे, ती रद्द करुन नव्याने घेण्यात यावी, अशी याचिका राष्ट्रवादी काॅंग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेनेच्या सदस्यांनी पुणे विभागीय आयुक्तांकडे दाखल केली आहे. यामध्ये विविध मुद्यांचाही समावेश आहे. यामुळे अध्यक्ष निवड प्रक्रिया पुन्हा राबविली जाणार का ? याविषयी चर्चा सुरू झाली आहे.या निवडीवेळी जोरदार […]

सांगली

सांगली जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात

जिल्ह्यातील तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या पूर्व भागातील द्राक्ष हंगाम आता अंतिम टप्प्यात आला आहे. यंदा अतिवृष्टी आणि बदलत्या हवामानामुळे उत्पादनात मोठी घट झालेली आहे. तरीही, द्राक्षांना सुरुवातीपासूनच चांगला दर मिळाल्याने द्राक्ष बागायतदारांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. तासगाव तालुका द्राक्ष शेतीचे आगार म्हणून ओळखला जातो. येथे शेतकरी मोठ्या प्रमाणावर निर्यातक्षम द्राक्षांचे उत्पादन करतात. मात्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून […]

पुणे

उजनी धरण पाणी पातळी ३८ टक्क्यांवर

पुणे, सोलापूर,अहिल्यानगर जिल्ह्यांसाठी वरदान ठरलेल्या उजनी धरण (यशवंत सागर जलाशय) यंदाची पाणी पातळी समाधानकारक असून बुधवारी (दि,८) रोजी पाणी पातळी ३८ टक्के झाली असून गतवर्षीच्या तुलनेत २० टक्क्यांनी यंदा पाणी साठा जास्त असल्याने शेतकरी, वर्गासह उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण पहायला मिळत आहे. यंदा सर्वत्र मोठ्या प्रमाणात झालेला पाऊस आणि धरण पाणलोट क्षेत्रात […]

नाशिक

“दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या…”; खरात प्रकरणात मोठे खुलासे

भोंदू अशोक खरात विरोधात आतापर्यंत १२ गुन्हे दाखल झालेत. त्यातील ११ गुन्ह्यांचा तपास एसआयटी करत आहे. दैवीशक्ती असल्याचं भासवून आरोपी खरात महिलांचे लैंगिक शोषण करायचा. मंदिर परिसरात हातचलाखीचा वापर करून समाजात अंधश्रद्धा पसरवायचा. शिवाय कुटुंबात मृत्यूची भीती दाखवून महिलांना धमकावत असल्याचं समोर आले आहे. या प्रकरणात ३० साक्षीदार, पीडितांची चौकशी सुरू आहे. या महिलांची कुठेही […]

कोल्हापूर

‘राधानगरी’त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद

पश्चिम घाटाच्या परिसरात वाघ, अस्वल आढळल्याने राधानगरीच्या वन्यजीव वैभवात भर पडली असून, अभयारण्याची जैवविविधता अधोरेखित होत आहे. वाघ, अस्वल, बिबट्या यासारखे प्राणी आढळत असल्याने वन्यजीव अन्य साखळीत त्यांचे अस्तित्व टिकवून आहेत. राधानगरी- दाजीपूर परिसरात गत २ ते ३ वर्षांत वन विभागाच्या ट्रॅप कॅमेऱ्यात वाघ, बिबट्या या प्राण्यांचे छायाचित्र टिपले. अलीकडेच सुभेदार, रायबा, सरदार आणि राणोजी […]