सरकारने देशभरात एकूण उत्पादनाच्या १५.८७ टक्के तर महाराष्ट्रात १२.५४ टक्के सोयाबीन एमएसपी दराने खरेदी केले. बाजारभाव कमी असल्याने तसेच एमएसपी दराने खरेदी यंत्रणा प्रभावी नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांना एमएसपीपेक्षा कमी दराने सोयाबीन विकावे लागले. यात त्यांना प्रतिक्विंटल किमान ७०० रुपयांचे नुकसान सहन करावे लागल्याने देशभरातील सोयाबीन उत्पादकांचे ४,७११.२८ कोटींचे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे २,३५०.८५ कोटी रुपयांचे नुकसान […]
नागपूर
कामठी नगराध्यक्षपद निवडणुकीला आव्हान; अब्दुल शकूर नागानी यांची जिल्हा न्यायालयात याचिका
कामठी : पराभूत उमेदवार अब्दुल शकूर नागानी यांनी जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करून कामठीनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला आव्हान दिले आहे. ही निवडणूक अवैध ठरवून रद्द करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी न्यायालयाला केली आहे. याचिकेमध्ये विविध गंभीर आरोप करण्यात आले आहेत. एकूण मतदान आणि ईव्हीएममधील मतांमध्ये १० मतांची तफावत आढळून आली. तसेच, सर्वोच्च न्यायालयाचे आदेश असतानाही या निवडणुकीत […]


