मुंबई उपनगर

पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा

ठाणे-बेलापूर औद्योगिक वसाहतीतील (टीटीसी) प्रस्तावित पुनर्वसन प्रकल्पामुळे शहरातील केवळ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करत असताना नवीन टॉवर्स, व्यावसायिक संकुले येऊन लोकसंख्येचा स्फोट होणार आहे. यामुळे महापालिकेवर पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी अभूतपूर्व ताण येणार आहे. त्या पुरविण्यासाठी अंदाजे १२ हजार कोटींचा बोजा पडू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात येतो. यामुळे महापालिकेतील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी या योजनेविरोधात विरोधाचा सूर आळवला आहे. […]

पालघर

पालघरमध्ये मालगाडीच्या धडकेत तिघांचा मृत्यू

मालगाडीच्या धडकेत तीन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना पालघरच्या जैन मंदिराजवळ घडली. मात्र, साध्या वेशातील पोलिसांनी शुक्रवारी (दि. १३) रात्री पाठलाग केल्याने घाबरून पळताना अपघात होऊन तिघांचा बळी गेल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला आहे. पालघर पूर्वेतील वीरेंद्रनगरातील तीन तरुणांना गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एका मालगाडीने पालघरच्या जैन मंदिराजवळ उडवले. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. यापैकी एका तरुणाच्या नावावर पालघर पोलिस ठाण्यात गुन्हा […]

ठाणे

धुळीवर मशीनद्वारे पाणी फवारणी करण्याऐवजी दिले जाते झाडांना पाणी

भुयारी गटार योजनेअंतर्गत खोदलेल्या रस्त्यामुळे शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. हवेतील प्रदूषण आणि अतिसूक्ष्म धूळ कमी करण्यासाठी, त्यावर पाण्याचे अतिशय बारीक तुषार उडवणाऱ्या मशिनरीचा वापर करणे गरजेचे आहे. मात्र या मशीनद्वारे झाडाला पाणी देणे, पुतळे धुण्याचे काम केले जात आहे. महापालिका मालकीच्या मशीन असतानाही मशीन हाताळल्या प्रकरणी लाखोंचे बिल अदा करण्यात येत आहे. उल्हासनगरात अमृत योजने […]