वसमत येथील शहरपेठ भागातील रहिवासी रितेश विष्णुपंथ टाक (वय ४०) आणि स्वर्णकार कॉलनीतील मयूर शहाणे (वय ३८) हे दोघे रविवारी(५ एप्रिल) दुपारी सुमारे १.३० वाजता दुचाकीवरून छत्रपती संभाजीनगरकडे जात होते. जिंतूर-औंढा मार्गावरील भोगाव गावाजवळ समोरून येणाऱ्या कारशी त्यांच्या दुचाकीची अत्यंत भीषण धडक झाली. अपघात इतका भीषण होता की, दुचाकी आणि कार या दोन्ही वाहनांच्या पुढील भागाचा पूर्ण चक्काचूर झाला.


